उद्दिष्ट
- महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्मातील लोकांना तसेच समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत, प्रत्येक वर्गाला शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या सर्व योजनांचा कुठल्याही अडथळ्याविना लाभ घेता यावा हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- राज्यातील नागरिकांना शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या योजनांसाठी कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- नागरिकांना एकाच छताखाली शासनाच्या सर्व योजनांची माहिती मिळावी.
- सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
वैशिष्ट्य
- महाराष्ट्र शासनाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- जिल्ह्यात सुमारे ५ हजार ४५७ कोटी निधीच्या वस्तूंचे वाटप या अभियानाद्वारे करण्यात येणार आहे.
- योजनेअंतर्गत राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर तालुका कल्याण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
- एकाच पोर्टलवर नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे.
- या योजनेद्वारे शासन थेट नागरिकांच्या दारी येत आहे.
- या योजनेअंतर्गत महसूल, कृषी, शिक्षण, आरोग्य तसेच विविध महामंडळांच्या योजनांचा समावेश असणार आहे.